whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Vadgaon News : अखिल भारतीय वारकरी मंडळ व पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या वतीने पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्यांचा सन्मान

तारीख : 24-06-2024श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Maval News : यशवंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे तर कार्यकारी संचालक पदी भारत काळे बिनविरोध

तारीख : 29-05-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : साते येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे यांची तर कार्यकारी संचालक पदी भारत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील पहिली कोअर बँकिंग प्रणाली असलेली संगणीकृत पतसंस्था म्हणून ओळखली जाते. सदर पतसंस्थेची सन २०२५ ते २०२९ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. वडगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात पदाधिकारी निवड घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आगळमे, कार्यकारी संचालक काळे उपाध्यक्ष पदी दत्तात्रय मोहिते तर खजिनदार पदी भरत आगळमे व सह खजिनदार पदी दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 


यावेळी नवनिर्वाचित संचालक सचिन आवटे, विजय उभे, संभाजी बोऱ्हाडे, नामदेव गाभणे, बबन गावडे, मारुती आगळमे, समीर आगळमे,  लक्ष्मीबाई आगळमे, भारती सातकर, चंद्रकांत भालेकर आदी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.


संपूर्ण मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेचे एकूण २३७० सभासद असून संस्थेची उलाढाल ५५ कोटी ६५ लाख एवढी आहे. संपूर्ण कोअर बँकिंग प्रणाली विकसित असलेल्या पतसंस्थेचे सभासदांसाठी मोबाईल बॅकिंग, एसएमएस बँकिंग सह अनेक ओनलाइन सेवा उपलब्ध आहेत. विविध आकर्षित ठेवी व शेतकरी कामगार व उद्योग व्यवसायींकांसाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत.


यावेळी अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब आगळमे यांनी निवडीनंतर बोलताना म्हणाले की, भविष्यात पतसंस्था शेतकरी कामगार व लघुउद्योजक यांच्या पाठीशी उभे राहिल व सामाजिक सहकार चळवळ व पतसंस्था अधिक बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत राहील.

whatsapp

Ashadhi Wari 2025 : सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तारीख : 29-05-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या १० दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.


पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या.


पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.


विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे


राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घ्यावी. सर्व मानाच्या पालख्यांना सेवा सुव्यवस्थित राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपल्यावर पोलीस बंदोबस्तासाठी पुढील जिल्ह्यातील पोलिसांनी अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.


वाखरी : मॉडेल वारकरी तळ करणार


सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


यावर्षीही राहणार समूह विमा


पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी १५ ते २० लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले


‘निर्मल वारी, हरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा


वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.


३६ वॉटरप्रुफ मंडप


पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी ३६ वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


यावेळी वारकरी, पालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

whatsapp

Lonavala News : लोणावळाकरांना धो-धो अवकाळी पावसाने झोडपले; २४ तासात तब्बल 'येवढ्या' पावसाची नोंद?

तारीख : 26-05-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

लोणावळा (Lonavala) : कोकण किनारपट्टीला मान्सून धडकला असून मावळातही गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या लोणावळा शहरात गेल्या चोवीस तासात तब्बल २३२ मिमी पाऊस पडला. मान्सूनपूर्वीच लोणावळाकरांना ४१० मिमी अवकाळी पावसाने झोडपले असून शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. 


मावळात मान्सूनलाही टक्कर देईल अशा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच सर्वच ओढे- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सह्याद्रीच्या कडेकपारी हिरवळ पसरली आहे. त्यामुळे हे नेत्रदीपक निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मावळ परिसरात पर्यटक दाखल झाले आहेत. विकेंडमुळे पर्यटकांची संख्या वाढल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. 


तर रविवारी (दि. २५ मे) सकाळपासूनच पावसाने रियसल सुरू करून दुपारनंतर जोरदार प्रात्यक्षिके दाखवली. त्यामुळे लोणावळा शहरात २३२ मिमी पाऊस नोंदवला गेला. तर यावर्षी मान्सूनपूर्वीच ४१० मिमी पावसाची नोंद झाली.  

whatsapp

Maval News : पवना विद्या मंदिर विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल; ९२ टक्के गुण मिळवून पूर्वा घरदाळे केंद्रात प्रथम

तारीख : 14-05-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawnanagar) : येथील पवना विद्या मंदिर विद्यालयाच्या दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली असून शाळेची विद्यार्थिनी कु. पूर्वा शशिकांत घरदाळे ९२.२० टक्के गुण मिळवून पवना केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.


मंगळवारी (दि. १३ मे) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पवनानगर केंद्रावर वेगवेगळ्या शाळांतून प्रथम येण्याचा मान मुलींनीच मिळविला. तर पवना विद्या मंदिर शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. पवना शाळा ही परिसरातील ४० गावे व वाड्यावस्त्यांसाठीची मुख्य केंद्र शाळा म्हणून परिचित आहे. या शाळेत बालवाडी पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या शाळेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.


निकाल व टक्केवारी पुढीलप्रमाणे

१) कु. घरदाळे पूर्वा शशिकांत  - ९२.२० टक्के 
२) कु. डोंगरे पायल जितेंद्र - ९०.२० टक्के 
३) कु. सावंत वेदांतिका विवेक - ९० टक्के


परिसरातून यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे, वर्गशिक्षिका सुमन जाधव, वैशाली वराडे तसेच सर्व शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के तसेच संस्थेचे सर्व संचालकांनी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच परिसरातून सर्वांचे अभिनंदन होत आहे.

whatsapp

Vadgaon News : मोरया स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

तारीख : 13-05-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मोरया स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून वडगाव शहरात घेण्यात आलेल्या ४५ किलो वजनी कबड्डी स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके आणि मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या शुभहस्ते झाला.


याप्रसंगी मावळ असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे तसेच असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ नेते मंगेश ढोरे, माजी सरपंच अर्चना भोकरे, श्रीधर ढोरे, अरुण निकम, नंदकुमार भसे, अबोली ढोरे, कातवी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा चव्हाण, नगरसेविका पूनम जाधव, वैभव पिंपळे तसेच छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ, मोरया महिला प्रतिष्ठान संचालिका, स्थानिक नागरिक आणि प्रशिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वडगाव घेणंद येथील भैरवनाथ कबड्डी संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी, तृतीय क्रमांक आमदार सुनील आण्णा शेळके कब्बडी संघ वडगाव, चतुर्थ क्रमांक डॉ. पतंगराव कदम कब्बडी संघ पुणे हे संघ विजयी झाले. विजयी झालेल्या संघांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.


मोरया महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. कबड्डी हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ आहे आणि मुलींमध्ये या खेळाची आवड वाढत आहे. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास तसेच निर्णय क्षमतेत वाढ होते.


कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असल्याने सर्व शाळांमधून हा खेळ खेळला जातो. कबड्डीला एक प्रकारचं झळाळतं रूप व प्रसिद्धीचं वलय लाभल्यामुळे देशी खेळांना पुन्हा सुगीचे दिवस येतील आणि कबड्डीला व कबड्डी खेळाडूंना चांगले सादरीकरण करता येतील. यासाठी पुढील कालावधीत आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून वडगावमध्ये भव्य क्रीडांगण करण्यासाठी प्रयत्न करून मँट वरील भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस अबोली ढोरे यांनी व्यक्त केला.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक अमोल गुडेकर आणि छत्रपती संभाजी नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रमोद जंगम यांनी सूत्रसंचालन तर यशवंत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

whatsapp